Monday, April 16, 2012

२१ मे फुआलपानी, २२ मे- झीरमी

आमच आजच्या दिवसाच टार्गेट ते म्हणजे ९५०० फुट उंचावरील ‘फुआलपानी कॅम्प’. सकाळी सगळ वेळेत आटपून, टेंट वगेरे साफ करून आम्ही नाश्ता केला, त्या दिवशीच जेवण डब्यात भरल, आणि सकाळी ७.३० रांगेत उभे राहिलो. सेनापती सोमण काकांनी आमच्या ग्रुप च्या वतीने कॅम्प लीडर आणि त्यांच्या आचारी वर्गाचे आभार मानले आणि त्यांना अलविदा करून फुआलपानी कडे रवाना झालो. वास्तविक वळण हे फार नागमोडी होते, नेहमीप्रमाणे आमचे जोशी ग्रुप चे शिलेदार पुढे गेले आणि मी रमत गमत चालू लागलो. वास्तविक माझ जड सामान मला त्रास देत होतच, आदल्या रात्री मी ‘आयोडेक्स’ लावल होत आणि वैद्य श्रीकांत कडून ‘रिली स्प्रे’ खांद्याला मारून घेतला(हे रोजच चालू होत, पण कुणाची मदत घ्यायची नाही हा माज आडवा आल्याने कुणाला मदत मागितली नाही आणि तसच निभावल). वास्तविक माझा उजवा खांदा निखळला असल्याने, चढावर खूप ताण यायचा, तेव्हा श्रीकांत आणि बाकी जोशी मंडळीनी मला पोर्टर घायची सूचना केली(आमच्या ग्रुप मधील कविताने घेतलेला असल्याने) आणि माझी खिल्ली उडवायला लागले, पण पुण्याचे रक्त अंगात असल्याने आणि चिकाटी असल्याने मी दुर्लक्ष केल(हे चिडवण रोज असायचं श्रीकांतच पण त्याला काही दाद दिली नाही मी). वास्तविक ते जंगल म्हणजे फक्त सूचीपर्णी वृक्षांची दाटी होती, अत्यंत गर्द आणि घनदाट. त्या वाटेत मी अर्जीन्दार उर्फ सोनू बरोबर मराठा आणी शिखांचा इतिहास, शिवाजी महाराज, शीख पद्धती वगेरे वर तात्विक चर्चा केली चालता चालता. मध्येच गुजराती मंडळीनी मला त्यांच्या खाण्याच्या ब्रेक मध्ये सामील व्हायचा आग्रह केला आणी मी काही नमकीन पदार्थ त्यांच्याबरोबर खाल्ले. साधारण ४ च्या सुमारास आम्ही फुआलपानी स्पॉटला पोहोचलो. वास्तविक तो कॅम्प म्हणजे १ टेकडीच होती. टेकडीवर एक मोठा उतार आणी उतर संपल्यावर लगेच आमचा टेंट. टेंट ची रचना पण फार विचित्र होती. फुआलपानी चे वैशिट्य म्हणजे इथे सर्व गोष्टीना ट्रेकिंग करावे लागते. जेवण,पाण्याचा नळ, अगदी नैसर्गिक विधिना सुद्धा. प्रत्येक वेळेला चहा,सूप,जेवणासाठी सुद्धा मोठा चढ चढून जावे लागत असे. या कॅम्पचे मुख्य आपला ‘मराठी माणूस’ श्री कुलकर्णी म्हणून होते. वास्तविक ते मुंबईतील बांद्र्याचे पण कायमचे दिल्लीत स्थायिक झालेले. त्यांनी मराठी मंडळी पाहून आपणहून आमच्या टेंट मध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारल्या.(तेव्हा आमचा राज ठाकरे वाद नेमका टेंट मध्ये चालू होता, मी राजसाहेबांचा एकांडा शिलेदार मंदार-गौरव-प्रसाद च्या आरोपाना सामोरा जात होतो). त्यांनी दिल्लीत ही खूप मराठी माणस राहत असल्याचे सांगितले अगदी निर्भयपणे त्यामुळे ऐकून बर वाटल. त्या दिवशी कॅम्प फायर ही अंधारात करावी लागणार होती ती पण एका टेकडीवर(तिथे पण ट्रेकिंग). आमच्या जोशी मंडळीनी काही रस दाखवला नाही आणी जेवण झाल्यावर एकजात सगळे आडवे झाले, पण मी गाणी वगेरे म्हणण्यात पहिल्यापासून अग्रेसर असल्याने मी एकटाच गेलो. किर्र काळोख असल्याने आणी त्यादिवशी जरा दगदग झाल्याने फार कमी मंडळी कॅम्प फायरला आली. तिकडे मी हैप्पी च्या आग्रहावरून शंकर महादेवन चे ‘ब्रेथलेस’ गाण सदर केलं. वास्तविक ९५०० फुटावर इतक्या विरळ ऑक्सिजन असताना सतत ३-४ मिनिट गाणे हे मोठे आव्हान होते आणी ते मी यशस्वीपणे पेलले. त्याचे फार कौतुक झाले(म्हणून शेवटच्या दिवशी पण मला सर्वांसमोर गायचा आग्रह झाला). तिकडे आम्ही कुठली जुनी-पुराणी गाणी आठवून किर्र काळोखात म्हणत होतो आणी थंडीत त्याची मज्जा अजूनच येत होती. शेवटी मातृभूमीच्या प्रीत्यर्थ कॅम्प फायर चा शेवट मी

काल जरा सुखाने झोपल्याने सकाळी जरा उशिरा जाग आली, प्रसाद ने फटके मारून उठवलं. उठल्यावर पाहतो तर आमचे अप टू देट मंदार शास्त्री साहेब आवरून तयार होते. मग पटापट मे आवरून टेंट साफ केला. नाश्ता केला आणी डब्यात जेवण घेतलं. ७.३० ला कुलकर्णी सरांना आणी फुआलपानी ला जय महाराष्ट्र केला. आजचा प्रवास ९५०० फुट फुआलपानी ते ११००० फुट झीरमी असा होता. आम्ही जसजसे उंच उंच चढत होतो तसा Altitude sickness ची काही लक्षण काही जणांमध्ये दिसायला लागली. कानडी मंडळीतील राजलक्ष्मी हिला पित्त होऊन उलटी चा त्रास झाला मग त्या दिवसापुरता बाईनी पोर्टर घेतला. हैप्पी लं सुद्धा थोडफार मळमळत होतच. तसेच सर्वात जेष्ठ अश्या मा-१ आणी २ यांना पायदुखीचा त्रास व्हायला लागला. तेव्हा आमच्यातील वैद्य श्रीकांत जोशी याने सर्वाना वैद्यकीय उपचार करून दिले आणी सर्वांचे आशीर्वाद मिळवले.(नंतर डॉक्टर साहेबाना फार डिमांड आली). वाटेत आज प्रथम आम्हाला पर्वत शिखरावरून घसरत आलेला बर्फ एका सपाट जागी साचलेला मिळाला. मग बर्फ दिसल्यावर सर्वाना चेव आला. २ गात कडून एकमेकांना बर्फाचे गोळे करून मारायचा खेळ चालू झाला. आमच्यातील श्रीकांतराव जरा जास्तच उत्साह दाखवत खेळत होते(तसा तो प्रचंड शांत थोडासा संथ आहे.) त्यात गम्मत अशी झाली कि खेळता खेळता श्रीकांतच्या डोक्यावरचा गॉगल पडला आणी साहेबाना निघायच्या वेळी आठवल कि आपला गॉगल हरवला. मग सगळ्यांची शोध मोहीम चालू झाली. मी जरा नेहमीप्रमाणे तिरक डोक चालवून भलत्या ठिकाणी शोध घ्यायला लागलो, तेव्हा मला बाकीच्यांनी तिकडे पडण शक्यच नाही गॉगल’’ असा शेरा मारला, आणी एका दगडाच्या थोड आतमध्ये मला काहीतरी कळ्या रंगाची वस्तू दिसली. तो नेमका श्रीकांतचा गॉगल होता. तोपर्यत सर्वानी आशा सोडून पुढे वाटचाल चालू केली होती, तेवढ्यात मी गाजावाजा न करता शांतपणे श्रीकांतच्या हातात(माज दाखवत) गॉगल टेकवला(त्यानंतर सहसा त्याने माझी खेचली नाही). त्या दिवशीची चढण ४५ अंशाची सरळ होती, आणी जेवण झाल्यावर चढायला फार कठीण जात होते(आणी बर्फात खेळल्याने सर्वांचा बोका गार झालेला). आज सकाळी ट्रेक चालू करताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पावसाळी ट्रेकचा अनुभव सुद्धा मिळाला. आधी सांगितल्याप्रमाणे इथे हवा तासागणिक बदलते. त्यामुळे लगेच थोड्यावेळात उन येऊन आम्ही चक्क ३ इंद्रधनुष्य एकाच वेळी पाहू शकलो. नुकत्याच पावसामुळे प्रसन्न झालेली हिरवळ आणी पायाखालच्या गवतावर आणी झुडुपाच्या पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे पाण्याचे थेंब मला चढ पार करायला उर्जा देत होते. वर पाहिलं कि दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे, अभ्राच्छादित आकाश, हिरवीगार घनदाट झाडी असे सौंदर्य म्हणजे एक अप्रतिम सुखाची अनुभूतीच होती.

एकदाचे ४ वाजता झीरमी ला पोहोचलोच. आता मला जरा जमिनीपासून बरच वरती आल्याचा फील आला होता. तिकडले कॅम्प लीडर हे सुद्धा आपले मराठी गृहस्थ नाशिकचे श्री मुलमुले म्हणून होते. त्यांनी आमचे स्वागत केले. संध्याकाळी नाश्त्याला चहाबरोबर गरम गरम बटाटे वडे होते. झीरमी सुद्धा अत्यंत सुरेख जागा होती. त्यात कॅम्प लीडरने सांगितले कि इकडे रात्री अस्वलं येतात त्यामुळे रात्री कॅम्प फायर ही टेंट मध्येच होईल. जेवण झाल्यावर आमच्या जोशी गटातील फक्त मीच कॅम्प फायर ला जातीने हजर होतो. प्रत्येकाने आपापली कलाकारी करून दाखवली, मी सोनुपाजीच्या(ये मुंडा सबसे ज्यादा छा गया ट्रेक मे) आग्रहावरून मी ‘मल्हारवारी’ म्हणले. स्वत मुलमुले साहेबांनी गाण्याची काही अदाकारी पेश केली. त्या दिवशी सुद्धा कॅम्प फायर ला उपस्थिती मोजकीच होती. रात्री दुध पिऊन शांत चित्ताने मी रात्री ९.३० वाजता झोपलो


23 मे- तिलालोटणी

सकाळी उठल्यावर आमच्यातील काही बायकांनी रात्री अस्वलं आल्याचे सांगितले मला ते काही खर वाटलं नाही, आम्ही जोशी मंडळीनी आवरल आणी पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झालो. आजचा प्रवास ११००० फुट झिरमि ते १२५०० फुट तिलालोटणी असा होता, सारपास पासून आता आम्ही फक्त १ कॅम्प दूर होतो. जसजस वर जात होतो तसतसा प्रवासाचा थकवा लवकर जाणवत होता, आधी ज्या वेगाने, किवा सलग जेवढा वेळ मी चालायचो, तेवढ या प्रवासात जमल नाही, कारण ऑक्सिजन पटली कमी होत असल्याने श्वसन करणे थोडे कठीण असते. हवेत पण कमालीचा गारवा होता, झिरमि सोडल्यावर हिमालयीन वातावरणाचा खरा फील मला आला. जसजसे वर जात होतो तसतसा सारपास जवळ जवळ येऊन आम्हाला खिजवत होता. आजूबाजूचे इतर सुळके आता खुजे वाटत होते, पण सारपास पाहायला अजूनही मान वर करावी लागतच होती(उगाच त्याला सारपास म्हणत नाहीत). बरेच चढ उतार पार करत ४ च्या सुमारास ‘तिलालोटणी’ कॅम्प वर पाउल टाकले. “अब हम मंजील के बहुत करीब थे”. तिलालोटणी कॅम्प हा उंच टेकडीवर उभा केलेला होता, आजूबाजूला नुसती हिरवळच होती, ती साईट मला (डिस्कवरी वर बघितलेल्या)लेह-लडाख च्या वातावरणाची आठवण करून देत होती. खडकाळ जमीन, त्यावरील अप्रतिम हिरवळ, उंच पर्वतसुळके, आणी टिपिकल हिमालयीन मंगोलियन वंशाच्या लोकांची वस्ती, दगडाच्या चीपोऱ्या रचून बांधलेले त्यांचे विशिष्ट मंदिर, सुसाट वेगाने वाहणारा वारा, आणी त्यातील झोंबणारा गारवा, एक वेगळेच अदभूत विश्व होते. तेथील गाईड ने आम्हाला त्या मंदिराच्या दिशेकडे न जाण्यास सांगितले. आम्ही जोशी ग्रुप ने मग एक फोटो सेशन केले. तिलालोटणी वर एक त्रास म्हणजे शौचालय हे एका भल्यामोठ्या उताराच्या पायथ्याशी होते,(जवळपास माझ घर ते बोडस कार्यालय एवढ अंतर). तो चढ चढणे फारच त्रासदायक काम होते. गाईड ने आम्हाला सूचना दिली, त्या रात्री कॅम्प फायर होणार नाही, कारण सारपास लं निघायला त्या दिवशी पहाटे २.३० ला उठायचे आहे. त्या दिवशी हिमालयीन थंडी ने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. आम्ही पोहचलो तेव्हाच १० डिग्री तापमान होत. रात्री कदाचित २-३ पर्यंत सहज गेल असेल, तोंडातून नुसत्या वाफा निघत होत्या त्या दिवशी. खर तर इतके दिवस माझ्या जड सामानाच मुख्य कारण म्हणजे पुण्याहून आणलेले भलेमोठे थंडीचे कपडे, पण आतापर्यंत एवढी विशेष थंडी न जाणवल्याने मी फक्त jacket वर होतो. पण त्या दिवशी मला स्वेटर, अजून एक jacket, मफलर(जे आतापर्यंत माझ असलेल मंदार वापरत होता, ते मे आज मागून घेतल). एवढे वस्त्रालंकार परिधान करून रात्री स्लीपिंग बॅग मध्ये blanket घेऊन झोपलो.

२४ मे-बिस्केरी थाच

सकाळी २.३० ला उठलो, तेव्हा वातावरण कमालीचे गार होते, अजिबात उठवत नव्हते, शरीर दगडासारखे झाले होते, कसबस सगळ आटपल. त्या दिवशी मी नाश्ता केला नाही(रात्री ७.३० लं जेवल्याने, आणी उपम्याच्या नावाखाली खीर पहिल्याने खायचा मुडच गेला). आज खरी कसोटी होती, “अब हम असली मैदान मे उतरे थे”. नजर फक्त सारपास वर होती. साधारण ५ वाजता आम्ही निघालो, सूर्य हळूहळू वर येत होता, आजचा रस्ता प्रचंड चढाचा होता. सारखी धाप लागत होती, आम्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडे कुच करत होतो. बर्फ बघायला डोळे आसुसलेले होते कधीचे(मुंबईत बाप जन्मात पाहिलं नसल्याने). आज आमच्यासाठी युथ होस्टेल ने खास शेर्पा जमातीचे गाईड नेमलेले होते जे बर्फाच्छादित प्रदेशात सराईतपणे वावरतात(आपण मुंबईत रेल्वे स्टेशन वर पण वावरत नाही इतक्या सफाईने हे बर्फात चालतात). एका पोईंट ला पोहोचल्यावर आम्हाला दुरवर लांबच लांब पसरलेलं बर्फ दिसल. आणी सारपास आता काहीच अंतर दूर होता. खर तर मी डोंबिवलीतच ठरवलेल होत कि एक भगवा झेंडा घेऊन जायचा इकडून आणी तिकडे रोवायचा, पण तो काही मिळाला नाही(काय बाळासाहेब, राजसाहेब, डोंबिवलीत भगवा उपलब्ध झाला नाही). मला काही करून तो रोवायचा होता. उत्तर भारतात मला भगवा मिळणं फारच अशक्यप्राय होत. मी आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे भगव्या रंगाच्या कापडासाठी चौकशी चालू केली होती अगदी पहिल्या दिवसापासून, पण कुणाकडे काही मिळत नव्हत. त्या दिवशी पण माझा भगव्या कापडाचा शोध चालूच होता. सारपास जेमतेम तास-दिडतासावर ठेपला होता. बर्फात चालता चालता सहज मी पंजाबदा शेर अर्जीन्दार उर्फ सोनू याला सहज विचारले भगव्या कापडाविषयी(त्या दिवशी मला काहीही चालल असत, ओढणी, टोवेल अगदी napkin पण चालला असता). तर त्याने लगेच मला त्याचा डोक्याला बांधायचा भगवा रुमाल काढून दिला(त्याला सुद्धा मराठी मातीशी इमान होतं, मुंबईचा होता, बघा मराठी माणसानो). भगवा पाहिल्यावर माझा बारा वाजेलेला चेहरा जो काही खुलला आणी अंगात कुठून एक प्रकारचा जोर आला(जस गाडीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरल कि गाडी मध्ये जान येते), मी प्रसाद आणी माझ्या इतर सवंगड्याना हाक मारत अक्षरश पळत सुटलो. प्रसाद माझ्या नजरेच्या रेंज मध्ये दिसला, अक्षरश पळत जाऊन त्याला मी भगव कापड दाखवलं. त्याचा चेहरा पण प्रचंड खुलला, नंतर प्रदीप आला, त्याला पण प्रचंड आनंद झाला भगवा पहिल्याने. मग आम्ही सर्वानी एक काठी घेऊन त्या भोवती भगव कापड गुंडाळून त्याचा अगदी व्यवस्थित ‘भगवा झेंडा’ केला. आणि एकदाचे सारपास पाशी पोहोचलो.

वास्तविक सारपास शिखराच्या टोकावर जायला बर्फाचा मोठा चढ पार करायचा होता, पण गाईड ने सांगितले तुम्हाला हव तर जाऊ शकता, मी आणी प्रसाद धैर्य करून बऱ्याच उंचावर गेलो भगवा घेऊन आणि तिकडे भगवा रोवला बर्फात. जेव्हा बर्फात चढ चढण अगदीच अशक्य झालं, तेव्हा सारपास च टोक काहीच अंतरावर होत, पण जाण शक्य नव्हत. मी धडपडत, आपटत आटोकाट प्रयत्न करत होतो वर जायचा पण काही जमल नाही आणी प्रसाद ने पण न जाण्याचा सल्ला दिला तो मी नाईलाजाने ऐकला. आम्ही भल्यामोठ्या चढाच्या टोकावर होतो. सरळ चालत उतरण बर्फातून शक्यच नव्हत. शेवटी मी आणी प्रसाद ने बर्फातून स्लाईड केली आणी पाय्थ्याशी आलो. तो पर्यंत ‘रंगीन पांडा’ ग्रुप ची बाकी मंडळी हजार झाली. तिकडे सर्व बर्फात स्लाईड करू लागले, आपल्या मराठी मंडळी मधील सोमण काका, संतोष, कविता-नेहा यांनी देखील भगव्या बरोबर फोटो काढून घेतले. मग ब्रेक झाल्यावर निघायच्या वेळी मी प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अशी जोरदार घोषणा दिली आणी सर्वानी नंतर एकसुरात जय म्हणत तो परिसर दणाणून सोडला.

सारपास ला पाय लावून आल्यावर आम्हाला बिस्केरी कॅम्प गाठायचा होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवास होता. जस सारपास वरून आम्ही बर्फात पुढे चालत होतो, तर समोर दिसला अत्यंत अरुंद असा बर्फाचा रस्ता, खाली भलामोठा बर्फाने भरलेला उतार, त्या अरुंद वाटेत पाय सटकला जर बर्फात तर माणूस उतारावर किमान ५० एक फुट खाली स्लाईड होतो(आमच्यातील सोमण काका, जुमाना,नरेन हे खाली स्लाईड झालेच). अत्यंत बिकट अशी वाट होती ती, मध्येच पाय बर्फात खोल रुतायचा, पाठीवर भलमोठ सामान, अंगावर सुती जाड कपडे, त्यात चालून चालून धाप लागायची(जरा थांबल की तो नालायक शेर्पा शिटी मारायचा आणी चालायची सूचना द्यायचा) अश्या समस्यांवर मात करत आम्ही तो मार्ग एकदाचा पार केला आणी एका डोंगराच्या कड्यावर पोहोचलो, जिथून एक सुसाट प्रवास चालू होणार होता. त्या डोंगरावरून आम्हाला हे भल्यामोठ्या बर्फाच्या उतारावर जवळपास १ किमी स्लाईड करत(घसरत जात) जायचं होत(सामानासकट). एकेक जण पुढे जायला लागला, माझ्यापुढे मंदार,प्रसाद, प्रदीप गेले, मग मी जसा उतारावर बसलो, पाय पसरले, आणी हात वर करताच जे घसरगुंडीसारखा घसरत खाली जायला लागलो ते पण सुसाट वेगाने(अगदी घसरगुंडी वरून उतरतात तस), मला एकदम ६०-७० ने बाईक चालवल्यासारख वाटत होत. मी तुफान वेगाने घसरत चाललेलो, शेवटी जिथे उतार संपला तिथे माझ्या वेगाला चाप लागला, आणी मी काही क्षण तेथेच बसून राहिलो, एकदम मला भलत्याच विश्वात गेल्यासारखे वाटते, मजा,थ्रील,वेग,साहस या सगळ्या गोष्टी एकदम अनुभवायला मिळाल्या होत्या त्यामुळे छाती नुसती जोरजोरात धडधडत होती. जरा दम खात होतो तर तेवढ्यात पाठून जुमाना उर्फ जुम्मी तुफान वेगाने घसरत आली आणी तिचा वेग कंट्रोल न झाल्याने माझ्या बॅगेवर जोरात आदळली, आणी मी तिच्या धक्क्याने उलटा पालटा पडलो बर्फात.(लाथ घातली तिने पेकाटात तर काय होणार माझ). मग थोडीशी मजल दरमजल करत बर्फातून चालत होतो, मध्येच हिमनद्या प्रचंड वेगाने वाहताना दिसत होत्या. परत एका पोईंट वर जेव्हा पोहोचलो तेव्हा अजून साधारण १ किमी ची दुसरी स्लाईड करायची होती. मला खूप आनंद झाला ते ऐकून. मग परत तंगड्या पसरून हात वर करून जे उतारावर आपली डेक्कन क्वीन धावत सुटली की विचारू नका. या वेळी उतार अजून स्टीप होता मागच्यावेळपेक्षा, त्यामुळे वेगही जास्त होता, या वेळी तर मला वेग नियंत्रित करता न येऊन डोक्यावरून आपटून उलटा पालटा होत गडगडत मी काही अंतर गेलो आणी आपोआप त्याच वेगात परत मूळ पोझिशन वर आलो(मला कळल नाही हे कस शक्य आहे पण झाल खर). उतार एकदाचा संपला, या वेळी पटकन उठलो(नाहीतर परत लाथ बसायची पेकाटात). मग मजल दरमजल करत आम्ही एकदाचे ‘बिस्केरी थाच’ कॅम्प वर पोहोचलो. त्या दिवशी तिकडे नाश्त्याला गरमागरम मुगभजी होत्या, आमच्यातील प्रत्येक जण बांगलादेशातून आल्यासारखा भजीवर तुटून पडला, त्या गाईड ने पण आमच्या भुकेल्या निर्वासित बांधवाना भरपूर वेळा मुगभजी रिपीट दिल्या.(अर्ध्या आम्ही जोशी ग्रुप ने संपवल्या). मग सूप प्यायलो. त्या दिवशीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं, आयुष्यात काहीतरी जिगरबाज कृत्य केल्याच सुख लाभत होत, मला तर विश्वास च बसत नव्हता की कसोल मधून अशक्यप्राय वाटणारा सारपास आम्ही सर केला, तो पण निर्विघ्नपणे. अगदी जेष्ठ नागरिक असलेल्या मा पा पासून ते १५ वर्षाच्या गुजराती मुलापर्यंत सर्वानी ती सफर यशस्वी केली होती. कुणीही माघारी परतला नव्हता. सर्वच्या सर्व धडधाकट होते. बिस्केरी वर आम्ही आमच्या ग्रुप च्या नावाने एकच जल्लोष केला. मग नंतर आम्ही मोकळ्या वेळात ‘दमशेराज’ खेळलो. त्यात मंदार ने सुंदर अभिनय करून चित्रपट ओळखायचे काम सोपे केले.(एकेक चित्रपटांची नाव अगाध होती हा भाग वेगळाच). मग जेवण केले, त्या रात्री मी आणी आमच्यातल कुणीच कॅम्प फायर मध्ये सहभागी न होता निद्रेच्या अधीन व्ह्याचे ठरवले आणी जय महाराष्ट्र म्हणत भरल्या मनाने सुखात झोपलो.

२५ मे –‘भंदक थाच’

हा आमच्या सफरीतला शेवटचा कॅम्प होता. आम्ही हळूहळू पायथ्याशी वाटचाल करू लागलो होतो. आता चढ चढायचा नसल्याने मला जरा जड बॅग घेऊन उतरायला थोडस सोप पडत होत. आजचा प्रवास तसा जास्त होता, सुमारे ७-८ किमीचा होता. भंदक थाच’ कॅम्प ला युथ होस्टेल वाले भारताचे स्वित्झर्लंड म्हणतात, पण स्वित्झर्लंड पाहिलं नसल्याने मी तुलना करणार नाही. पण एवढ मात्र नक्की सांगू शकतो की इतर बाकी कॅम्प पेक्षा –‘भंदक थाच’ स्पॉट ला निसर्ग अफलातून होता. निसर्गाने भरभरून सौंदर्याचे दान या प्रदेशात टाकल होत. अतिशय विस्तीर्ण अस हिरवगार माळरान आणि वर आम्ही सर् करून आलेला साक्षात हिमालय होता. आम्ही जेव्हा प्रवासाची सुरुवात भून्तर पासून केली तेव्हा छान आल्हाददायक वातावरण होते त्यानंतरचे सर्वात सुंदर वातावरण तेव्हा त्या वेळी होते. कदाचित आता आपल्याला यापुढे चालाव लागणार नाही अजून या भावनेने अजूनच छान वाटत होत. नेहमी आम्ही कुठल्याही कॅम्प वर आलो की पहिले आडवे व्हायचो थोडावेळ, पण तिथे काहीतरी धावाव,खेळाव, धमाल मजा मस्ती करावी अस वाटत होत सर्वानांच. योगायोगाने त्या कॅम्प साईट वर आम्हाला एक कापडी चेंडू मिळाला. मग आम्ही अबधुबी किवा शेकाशेकी खेळायचं ठरवल. महाराष्ट्र विरुद्ध बाकी राज्ये अशी गटविभागणी झाली. गुजराती बांधवांना चेंडूने शेकवून शेकवून आम्ही पुरते बेजार केले. खूप दिवसांनी धावल्या-पडल्या मुळे बालपणीच्या त्या खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छान खेळ झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यात खेळता खेळता प्रसाद धडपडला आणि नेमका त्याच्या खिशातील त्याच्या मोबाईल वरच. त्याचा ७५ किलोचा देह (मी अंदाजेच सांगतोय, कमी जास्त किंबहुना जास्तच असाव)त्या मोबाईल वर पडला, हे लक्षात आल्यावर लगबगीने त्याने मोबाईल बाहेर काढला(एरवी माणूसही चेपला असता). सुदैवाने मोबाईल शाबूत होता(बघा नोकियाचे पीस किती धडधाकट असतात त्याचा अजून एक नमुना). मोबाईल काही चालू होईना, प्रसादच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंता उमटली पण त्या निमित्ताने नवीन मिळेल हा विचार त्याला सुखावत होताच. पण मजा अशी झाली त्याच्या मोबाईलची battery संपल्याने तो बंद होता, जेव्हा चार्जिंग चालू केल तेव्हा व्यवस्थित चालू झाला(आणि तो अजूनही वापरतोय तो पीस).

नेहमीप्रमाणे सूप वगेरे झालेच. आमचे नेते सोमणकाका यांनी सर्वांना बोलावले आणि त्यांचे Contact details एका कागदावर लिहून द्यायला सांगितले आणि ते गोळा करायची जवाबदारी मी आणि प्रसादने उचलली. त्याचबरोबर ह्या ट्रेक मध्ये जमलेली सर्वांची मैत्री अशीच कायम राहावी आणि पुढेही सार्वजन एकमेकांच्या संपर्कात राहावे यासाठी ओर्कुट आणि फेसबुकवर ‘रंगीन पांडा २०१०’ अशी Community काढायची ठरले आणि ती जवाबदारी अविनाशने उचलली. मग जेवणाचा कार्यक्रम ठरला आणि त्या दिवशीची कॅम्प फायर जोरदार करायचे ठरले. साधारण ९ वाजता कार्यक्रम चालू झाला. तिकडे प्रकाशासाठी आम्ही एक कल्पना काढली, लाकडे न जळवता आम्ही सर्वांच्या Torches गोळा केल्या आणि डिस्को लाईट प्रमाणे त्या अरेंज करून छान पैकी वातावरणनिर्मिती केली. त्या दिवशी प्रत्येकाने almost काहीना काहीतरी कला सदर केली. सुरुवातीला कोळीनृत्य, गरबा मग सोनूच्या ग्रुपचे आधुनिक रामायणाचे नाटक, दीपाचे नृत्य,दक्षिण भारतीय मंडळीचे folk गायन, दोन्ही मांचे सुंदर आवाजातील गायन असा कार्यक्रम रंगत होता. मग लोकाग्रहास्तव मी ब्रेथलेस गाण परत एकदा सादर केल त्यादिवशी. त्या कॅम्प फायरला खुपच धमाल आली. ती रात्र कधीच संपू नये अस प्रत्येकाला मनोमन वाटत होत. पण वेळेच्या आणि जागेच्या मर्यादा पाळण तितकच महत्वाच होत. नेहमीप्रमाणे Bournvita पिऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो

२६ मे- बेस कॅम्प कडे कूच

नेहमीप्रमाणे शिट्टीच्या आवाजाने आम्ही ५ वाजता उठलो(आम्ही म्हणजे मी सोडून सगळे, मला रोज फटके, लाथा मारून उठवायची जवाबदारी प्रसाद,मंदार,गौरव,श्रीकांत हे अगदी इतिकर्तव्य असल्यासारखे पार पाडतच होते. मी प्रदीपचे नाव घेत नाही कारण तो पण माझ्याच कंपूतील होता). एवढ्या पहाटे कदाचित आमची ती शेवटची वेळ होती उठायची. सगळे जण आवरून, स्लीपिंग बॅगस, blankets, परत करून लाईन लावून उभे राहिलो. ७ च्या सुमारास आम्ही भंदक थाच’ सोडले. आणि आमच्या कसोलच्या बेस कॅम्पकडे मार्गक्रमणा करू लागलो. As Usual मी आमच्या जोशी ग्रुप बरोबर न जाता सोनुच्या ग्रुपबरोबर चालू लागलो(ह्या लोकांना मरणाची घाई असते म्हणून आणि सोनूचा ग्रुप सर्वात शेवटी आरामात येतो, छान चकाट्या पीटत.) तिकडे आम्ही सगळे छान छान गाणी म्हणत टिंगल टवाळी करत हळूहळू येत होतो. असच बोलता बोलता कळले की दीपाबाई पण वाणिज्य शाखेच्या आहेत मग आमच्या accounts and commerce वर चर्चा चालू झाल्या. ती नावाजलेल्या KPMG फर्म मध्ये नोकरी स्थानकापासून थोड चालल्यावर मणीकर्ण आले.

मी या आधी गुरुद्वारा पहिला नसल्याने थोडस कुतूहल नक्कीच होत. प्रसादच्या सूचनेनुसार डोक्याला रुमाल बांधला. पण खरच पंजाब आणि पंजाबी लोक काय चीज असतात हे मला मणीकर्ण पाहिल्यावर २ दिवसात समजल. शीख समाजाविषयी मला फार आदरभाव नव्हता याआधी. पण २ दिवस गुरुद्वार्यात वास्तव्य केल्यावर “पंजाब दी मिट्टी दा असली रंग पता चल गया मेनू”. इतका सेवाभाव,श्रद्धा, भक्तिमय वातावरण हे पाहून मी भारावून गेलो. वास्तविक मणीकर्ण हे जगात तेथील गरम पाण्याच्या कुंडकरता प्रसिद्ध आहे. तेथील कुंडात आंघोळ करणे म्हणजे मोठ पुण्य आहे अशी हिंदू आणि शिखांची भावना आहे. इतके दिवस अंघोळ न करूनही मला अंघोळ करावीशी वाटली नाहीच त्या दिवशीही. बाकी सदस्य अंघोळ करून आले, आणि सर्वांच्या सामानाची देखभाल करायची जवाबदारी माझ्यावर दिली गेली.

मग आम्ही मुख्य देवस्थानाकडे रवाना झालो. एका प्रशस्त आणि भव्य जागेत वाहेगुरू गोविंदसिंग यांची तसबीर आणि पालखी आणि त्याला वारा घालणारा म्हातारा लांबलचक दाढीचा बाबाजी. हे असल् दृश्य मी चित्रपटातच पाहिलेलं होत पण आज प्रत्यक्ष पाहत आणि अनुभवत होतो. मी मनोभावे वाहेगुरुना आणि ‘गुरु ग्रंथसाहिब’ आणि त्या बाबाजीना नमस्कार केला. तो गुरुद्वारा नेहमीच गर्दीने फुललेला असतो. मी तिकडे आल्यापासून पंजाबी लोकांना बारीकपणे न्याहाळत होतो, मला हेवा वाटला ते त्यांच्या भरदार व्यक्तिमत्वांचा. जवळपास सगळे पुरुष एकदम आडदांड, उंचपुरे, आणि तगडे एकदम असली मर्द. आणि सुंदर नव्हे पण कमालीच्या सुंदर, रेखीव बांध्याच्या गोऱ्यापान मुली. त्यांची फिचर्स अत्यंत भारी आणि लोभस होती(क्षणभर मराठी मुली झक मारतील असा विचार आला, तो मुंबईत परत आल्यावर लगेच बदलला). खरच, सो कॉल्ड पंजाबी ड्रेस फक्त पंजाबी मुलीना सर्वात सुंदर दिसतो. बायका असो व पुरुष त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, हालचालींवरून अस्सल पंजाबिपणा स्पष्टपणे जाणवत होता. मला खर तर पगडी घालून(पुणेरी नव्हे पंजाबी)फोटो काढून घ्यायचा होता. पण आपली personality मी आरशात न्याहाळली आणि उगाच पंजाब्यांची लाज घालवायला नको म्हणून विचार सोडून दिला. नंतर आम्ही गुरुद्वार्याच्या ऑफिस मध्ये जाऊन खोलीसाठी विचारणा केली आणि लगेच मिळालीही तीही विनामुल्य. मग अंघोळ करून आलेले आवारात बसले, मी आडवा झालो. आवरण झाल्यावर आम्ही निवांत बसून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हिशोब मांडला. हिशोब करायच्या पद्धतीवरून प्रदीप आणि प्रसाद मध्ये थोडे मतभेद झाले. पण प्रदीपने खरच काटेकोरपणे आणि परफेक्ट हिशोब मांडला आणि बाकी उरलेली रक्कम सर्वाना समान विभागणी करून परत दिली. हिशोब झाल्यावर आम्ही महाप्रसाद म्हणजेच ‘लंगर’ साठी रवाना झालो. देव्स्थानाशेजारील एका प्रशस्त हॉल मध्ये लंगर होते. जवळपास ५००-१००० लोकांच्या क्षमतेचा तो हॉल होता. तिकडे अखंड दिवसभर लंगर चालू असायचे. शिखांचा सेवाभाव आणि श्रद्धा पाहून खरच अचंबा वाटतो. तिकडले वाढपी किवा सेवेकरी हे आमच्यासारखे क्षुद्र माणसे नव्हती तर गडगंज संपत्त बाळगणारे श्रीमंत पंजाबी उद्योगपती किवा शेतकरी होते. निव्वळ काहीतरी सेवा म्हणून अशा प्रकारची कामे करण्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नव्हता. लंगर मधील अस्सल पंजाबी जेवणाची लज्जत मी पहिल्यांदा अनुभवली. साधे परंतु अत्यंत चविष्ट जेवण होते ते. लंगर आटोपल्यावर आम्ही बाहेर आलो. आम्हाला कसोल ला परत बेस कॅम्प ला परतायचे होते कारण आमचे सामान आम्हाला आमच्या ताब्यात घ्यायचे होते. दुपारी ४ पर्यंत आम्ही बेस कॅम्प ला पोहोचलो(गेल्यागेल्या मी आणि अर्थात प्रदीप आडवे झालो). संध्याकाळभर आम्ही उनाडक्या करत बसलेलो कारण आमची दुसऱ्या दिवशी भून्तरहून दिल्ली करता बस होती. आमच्यातल्या खूप जननी संध्याकाळीच निरोप घेतला. बाकीच्यांचा निरोप लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायचा होताच. रात्री परत एकदा जेवण आणि नवीन बॅच कॅम्प फायर मधील पर्फोर्मंस पहिले आणि आडवे झालो.

सारपास. २७ मे- परतीच्या वाटेवर

आज बरेच दिवसांनी आम्हाला शिटीमी आयुष्यातून ब्रेक मिळाला. जरा फुरसतीत म्हणजे ६ वाजता उठलो. सगळं आटोपलं. माझ सगळ्यात नावडतं काम जे म्हणजे bag भरणे ते शेवटचे उरकले एकदाचे. साधारण नाश्ता झाल्यावर आम्हाला चेक आउट होते म्हणजे आम्हाला कॅम्प सोडायचा होता. आमच्या ग्रुप मधील काही जण अजूनही वास्तव्य करत होते आणि त्यांनापण निरोप घ्यायचा होताच. आम्ही शेवटचा नाश्ता एकत्र बसून केला. प्रत्येकालाच कॅम्प सोडून जायची वेळ जवळ येत होती तसतशी मनाला हुरहूर लागत होती. एवढ्या दिवसाच्या एकत्र सहवासाने आपापसात मैत्रीचे सुंदर नाते निर्माण झालेलं आणि विशेष म्हणजे त्याला वयाचे, पैशाच्या मर्यादा नव्हत्या. शेवटी ती वेळ आलीच. जोशी ग्रुप व इतर उरलेली SP 17 बॅच ची मंडळी चेक पोईंट पाशी जमली. आम्ही आमचे लाडके मुंबईकर कॅम्प लीडर श्री गोगटे सरांना भेटलो त्यांना निरोप दिला त्यांचे आशीर्वाद घेतले. तिकडून बाहेर आल्यावर एकमेकांना हस्तांदोलन करून निरोप देत होतो. सर्वानी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. गुजराती ग्रुपने खास करून ‘आम्ही तुम्हाला खूप मिस करू’ अशी जोशी ग्रुप ला विशेष compliment दिली(आता कुणी कुणाला कुणासाठी दिली हे जोशी ग्रुप जाणतोच). तिकडून सर्वांचा निरोप घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.